Friday, June 8, 2018

सशक्त विरोधीपक्ष

अशक्त विरोधीपक्ष असेल तर सशक्त लोकशाही उभी राहू शकत नाही. "आग को पानी से डर बने रहेना चाहीये" हा नियम आहे. पण सध्यातरी तशी परिस्थिती पोटनिवडणूका सोडल्या तर दिसत नाही.

सध्या मोदींसमोर/भाजपासमोर कुणी एक सशक्त विरोधी नेता नाहीये. जे आहेत ते मोदींना कुठल्याही थराला जाऊन, प्रसंगी पाकिस्तानची मदत मागून हरवायला बघत आहेत. देशात राजकीय विरोधक असूच नये असा प्रयत्न काँग्रेसमुक्त भारत या घोषणेत आहे. पण विरोधक असूच नये असे झाले तर ते लोकशाहीला आणि पर्यायाने भारताला घातक असेल. मोहनजींनी यामुळेच काँग्रेसमुक्त भारत या घोषणेला विरोध प्रदर्शित केला होता. (https://m.timesofindia.com/city/pune/congress-mukt-bharat-merely-a-political-slogan-rss-chief/articleshow/63576543.cms)

विरोधक हवेत, सशक्त हवेत आणि राष्ट्रवादी हवेत. जर सध्याचे विरोधी नेते असे विरोधक बनू शकत नसतील तर एक जगातील सर्वात मोठी असलेली संघटना म्हणून संघालाच हे काम करावे लागेल.

मी मागच्या वर्षी लिहिलं होतं की
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन सर्वोच्च राजकीय पदांवर स्वयंसेवक विराजमान झाले आहेत. त्यामुळे सर्व संघ संबंधितांना आनंद होणे स्वाभाविक आहे. अर्थात संघाचे सत्ता हे साध्य कधी नव्हते आणि असणारही नाही. पण राजकीय उद्दिष्ट म्हणून विचार केला तरीही आणखी एक महत्वाच्या पदावरही स्वयंसेवक/सेविका असायला पाहिजे, ते पद म्हणजे विरोधी पक्ष नेता!

बहुदा संघाने आता हे काम हातात घेतले असं वाटतंय. प्रणवदांचं भाषण एका राष्ट्रवादी नेत्याचं भाषण होतं.
भाषणातील प्रमुख मुद्दे:
१. २५०० वर्षांची राजकीय उथलपुथल ५००० वर्षांच्या संस्कृतीला संपवू शकली नाही.
२. लोकशाहीची व्याख्या अमेरिकेच्या "ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल"च्या कित्येक शतके आधी चाणक्याने जगाला दिली.
३. जगाचा ज्ञानाशी संबंधही नव्हता तेव्हा आमच्याकडे ७ मोठी विद्यापीठं होती.
४. आम्ही इतरांसारखे आक्रमक वा हिंसक नाही आम्ही वसुधैव कुटुंबकम्, सर्वेपि सुखिन: सन्तु या विचारांचे आहोत. भारतात सहिष्णुता आणि वैविध्यतेचा सन्मान होतो.
५. या भारतमातेसाठी त्याग करणाऱ्या आणि या भारताला वैभवशाली बनवू इच्छिणाऱ्या सर्वांचे मिळून हे राष्ट्र आहे.
६.  बुद्धाचा प्रचार हिंदू प्रभावातूनच झाला आणि या देशाला मौर्य, गुप्त, अशोक अशा थोर घराण्याचा वारसा आहे.
७. या देशात आलेल्या विदेशी विचारवंतांनीही या देशाच्या संस्कृतीचे गोडवे गायले.
८. पाश्चात्यांची राष्ट्र संकल्पना एक भूभाग, एक धर्म, एक शत्रू यावर आधारित आहे आणि ती योग्य नाही, आपली सर्वसमावेशक संस्कृती खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राष्ट्र आहे. प्रत्येक देशाचा राष्ट्रवाद हा त्या देशाची खरी ओळख असते.

हे भाषण इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्याचं भाषण होतं, इंदिरा काँग्रेस किंवा इटालियन काँग्रेसच्या नेत्याचं नव्हतं. अशा नेत्यांना बळ देऊन सशक्त राष्ट्रवादी विरोधी पक्ष तयार होणे आवश्यक आहे.

जय हिंद!

राजी

राज़ी
काही लोकांना हा सिनेमा पाकिस्तानची भलामण करणारा वाटला. कारण हे की त्यात पाकिस्तानी प्रेमळ कुटुंब दाखवलंय ज्याला भारतीय गुप्तहेरांनी फसवलं. एका अर्थाने हे खरंय. पण हा खूपच एकांगी विचार आहे.
या सिनेमाचा विषय होता एका सामान्य मुलगी, सहमत, देशासाठी गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते आणि तिथून आवश्यक ती माहिती कोणताही धोका पत्करून भारतात पाठवते. त्यासाठी ती तयार होते आणि शेवटपर्यंत आपला देश आणि कर्तव्य यापुढे सर्व गोष्टींना दुय्यम स्थान देत काम पूर्ण करते.
हा सगळा तपशील आपल्याला सहमतच्या बाजूने कळत राहतो. त्यामुळे सहजपणे "भारताने केलेल्या कारवाया किंवा कटकारस्थान" आपल्याला दिसते. पण ज्या गोष्टी सहमत पाहत नाही त्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे पाकिस्तानी सेना पंजाबी वर्चस्वासाठी बांगाल्यांवर अन्याय करते आहे, युद्ध सुरू झालेले नसताना INS विक्रांतला बुडावण्यासाठी गाझी पाणबुडीला पाठवत आहे, काश्मीर मधील मुसलमानांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे हे सहमत प्रत्यक्ष बघत नाही म्हणून आपल्याला ते प्रत्यक्ष दाखवलेही जात नाही. पण नीट बघितले तर हे सगळे संदर्भ त्यात दिसत राहतात. ते explicitly दाखवलंच पाहिजे हा अट्टाहास योग्य नाही.
जेव्हा इकबालला (सहमतचा नवरा) कळतं की सहमत हीच हेर आहे तेव्हा तो हदरतो. हे स्वाभाविक आहे पण नंतर तोच हे म्हणतो की "वतन के आगे कुछ नही". याचा अर्थ पाकिस्तानीही कट्टर दाखवले आहेतच.
या चित्रपटात जी गोष्ट महत्वाची आहे ती हीच की "वतन के आगे कुछ नही". एक अत्यंत सामान्य, साधी स्वप्न असलेली मुलगी देशासाठी मोठं दिव्य करायला तयार होते, मार्गातील अडचणी प्रसंगी जीव घेऊन दूर करते.

गुलजार यांचे सोपे शब्द, शंकर-अहेसान-लॉय यांची साधी चाल यातून साकारलेलं गाणं या चित्रपटाचं सार आहे.

ऐ वतन.. मेरे वतन..
ऐ वतन.. आबाद रहे तू
आबाद रहे तू.. आबाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू

मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन
ऐ वतन.. मेरे वतन

तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू
पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू मैं
जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन..

ऐ वतन.. मेरे वतन
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू

ऐ वतन.. ऐ वतन.. मेरे वतन.. मेरे वतन..
आबाद रहे तू.. आबाद रहे तू..
ऐ वतन.. मेरे वतन.. आबाद रहे तू..

https://m.imdb.com/title/tt7098658/

- ज्ञानेश