Friday, December 20, 2019

संघाचं हिंदुत्व (माझ्या आकलनानुसार)

संघाच्या हिंदुत्वात कुणी त्याज्य नाहीये. त्यात व्यापकता आहे, सर्वसमावेशकता आहे. संघाची विचारसरणी अनेक पद्यांमधून सहज व्यक्त होत असते. त्यामुळे यावर लिहिण्याचा विचार करताना आपोआप एक पद्य मनात उमटलं.

विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू हैं।
संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदु हैं।।धृ।।

राम कृष्ण गौतम की धरती, महावीर का ज्ञान यहां
वाणी खंडन मंडन करती, शंकर चारों धाम यहां
जितने दर्शन राहें उतनी, चिंतन का चैतन्य भरा
पंथ खालसा गुरू पुत्रों की बलिदानी यह पुण्य धरा
अक्षय वट अगणित शखाऐं, जड में जीवन हिंदु हैं ।।१।।

कोटी हृदय हैं भाव एक हैं, इसी भूमि पर जन्म लिए
मातृभूमि यह कर्मभूमि यह, पुण्यभूमि हित मरे जिये
हारे - जीते संघर्षों में, साथ लढे बलिदान हुए
कालचक्र की मजबूरी में रिश्ते नाते बिखर गये
एक बडा परिवार हमारा, पुरखे सब के हिंदु हैं ।।२।।

सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा आज करें
वर्ण - भेद मत - भेद मिटा कर नव रचना निर्माण करें
धर्म हमारा जग में अभिनव, अक्षय है अविनाशी हैं
इसी कडी से जुडे हुए, युग युग से भारतवासी हैं
थाय अथाह जहां की महिमा, गहरा जैसे सिंधु हैं ।।३।।

हरिजन गिरिजनवासी बन के, नगर ग्राम सब साध चलें
उंच नीच का भाव घटा कर, समता के सद्‌भाव बढें
ऊपर दिखते भेद भले हों, जैसे वनमें में फूल खिले
रंग बिरंगी मुस्कानों से, जीवन रस पर एक मिले
संजीवनी रस अमृत पीकर, मृत्युंजय हम हिंदु है ।।४।।

यात कुठेही भारतीय भूमीत जन्मलेल्या उपसनापद्धतीबद्दल अनादर, आक्षेप नाही तर जेवढी दर्शने आहेत तेवढे रस्ते आहेत हा भारतीयत्वाचा आत्मा अधोरेखित केलाय. या वटवृक्षाच्या कित्येक फांद्या आहेत, पण मूळ जीवनरस हिंदू (म्हणजेच भारतीय) आहे हे अधोरेखित केलंय. या भारतभूमीला मातृभू, पुण्यभू मानणारे सगळेच आपले आहेत. संघर्षाच्या काळात हार जित झाली आणि नाते तुटले (धर्मांतरे झाली) तरीही सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्यामुळे आपण सर्व भारतीय एक परिवार आहोत हीच संघाची धारणा आहे. मतभेद आणि वर्णभेद मिटवून नवरचना निर्माण करताना जुन्या गैर गोष्टी अर्थातच टाकाव्या लागणार याची सार्थ कल्पना संघाला आहे. शेवटच्या कडव्यात पुन्हा एकदा विविध जाती, पंथ, निवास यामुळे भिन्न असलेल्या हिंदूंमध्ये कोणताही भेद असू नये हे सांगितलंय. त्याचं वर्णन करताना वनात जसे अनेक फुलं असतात तसेच हेही, परंतु पुन्हा या विविध रंगात जीवनरस एकच आहे हे सांगितलंय. संघाचं हिंदुत्व हे असं सर्वसमावेशक आहे.

याच आशयाची संघाची अनेक पद्ये आहेत. ज्या सर्वांत कायम सामाजिक समरसतेबद्दल सांगितले आहे. कुठेच कुणी भारतीय आपला शत्रू आहे आणि त्याला मारले पाहिजे हे संघ शिकवत नाही.
१ - हिन्दु जगे तो विश्व जगेगा
२ - जनसेवा ही ईश्वरभक्ति
३ - हिन्दु हिन्दु एक रहे
४ - हिंदू सारा एक मंत्र हा

आता प्रश्न येतो अभारतीय उपासना पद्धतीचं काय? त्याचं उत्तर भारतीय पद्धतीनेच देता येईल. ज्याला जी उपासनापद्धत योग्य वाटते त्याने ती अनुसरावी. पण ते करताना इस्लाम वा ख्रिश्चन धर्मात जसं सांगितलं जातं की "हाच एकमेव मार्ग आहे" हे असू नये. "हाही एक मार्ग आहे" या तत्वानुसार भारतात तर चार्वाकासारखे शतप्रतिशत नास्तिक सुद्धा आहेत आणि त्यांची गणना हिंदू दर्शनातच होते. त्यामुळे केवळ अभारतीय उपासना पद्धत आहे म्हणून इस्लाम किंवा ख्रिश्चनांचा संघ विरोध करत नाही. विरोध सुरू होतो फसवणुकीतून किंवा जबरदस्तीने धर्मांतर आणि "हाच एकमेव मार्ग" या मानसिकतेमुळे. तेहतीस कोटी देवांमध्ये अल्ला आणि येशू सामावून घेणं भारतीयांना कठीण नाही. "केवळ तेच" हा मुद्दा मात्र नक्कीच विरोधाचा आहे.

हिंदू धर्म हा एक पुस्तक, एक प्रेषित, एक मार्ग असा बनलेला नाही. अनेक मार्ग, अनेक विद्वान, अनेक पुस्तकं या मंथनातून बनलेला आहे. शिवाय आज सहा आस्तिक आणि तीन नास्तिक दर्शने समजून घेऊन, त्यापैकी एकानुसार आचरण कुणी करत नाही. कारण याच्या पुढे पुराणं आली, रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आली, नवीन देवता आल्या. शीख पंथ उदयास आला आणि तेही सर्व इथे गुण्यागोविंदाने नांदू लागले. अजूनही नवे पंथ, संप्रदाय तयार होऊ शकतात - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज अशी उदाहरणे आहेतच. या सर्वांना सामावून घेणारं हिंदुत्व, संघाचं हिंदुत्व आहे.

आज बरेच पुरोगामी विद्वान असं म्हणतात की इतकी विविधता असलेल्या प्रदेशांचा देश होऊ शकतो, पण हे एक राष्ट्र आधी कधीच अस्तित्वात नव्हते. त्यांना असं वाटतं कारण या राष्ट्राचा आत्मा - हिंदुत्व - त्यांना मान्यच नसतं. जेव्हा सरदार पटेलांनी सर्व संस्थानांना भारतात सामावून घेतलं तेव्हा त्यांनी "एक संस्कृती" यावरच भर दिला होता. केवळ त्या आवाहनावर पाचशेच्या वर संस्थाने भारतात विलीन झाली. भारतात राज्ये अनेक होती पण त्यातील संस्कृती एक होती आणि आहे. अन्यथा दाक्षिणात्य माणसाचे नाव शिवरामकृष्ण का असतं? एका केरळी माणसाने भारताच्या चार भागात मठ का स्थापन केले? मूर्तिपूजक, निसर्गपूजक, विविध दैवतांना मानणारे, वेद नाकारणारे आणि देव/मोक्ष या सगळ्याच संकल्पना नाकारणारे भारतात सुखेनैव राहत होते आणि राहताहेत, त्याचं कारण हिंदुत्वच आहे. या विविधतेत जी एकता आहे ते हिंदुत्व आहे. किंवा मी असं म्हणेन की संघ याच एकतेला हिंदुत्व मानतो. यावर अधिक वाचायचं असेल तर संघाचं एकात्मता स्तोत्र बघावं.

संघ कधीही पुन्हा सतीप्रथा सुरू करा म्हणणार नाही, धर्मातील योग्य सुधारणांना संघाचा कायमच सक्रीय पाठिंबा राहिला आहे (उदा - देवदासी प्रथेविरुद्ध संघाचं/संघ स्वयंसेवकांचं काम बघावं). शबरीमला सारख्या गोष्टी या "धर्म सुधारणा"पेक्षा "पुरातन वारसा" या अशयातून बघव्यात असं संघाचं मत आहे. पण जर बहुसंख्य महिलांनी शबरीमला येथे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली तर संघ त्याला विरोध करणार नाही.

जशी पूर्वी अनेक विद्वानांकडून अनेक पुस्तके, नीती नियम लिहिले गेले आणि भारतात ते सामाजिक धार्मिक नियम म्हणून पळाले गेले, तसेच स्वतंत्र भारतात अनेक विद्वानांच्या विचारमंथनातून नवीन पुस्तक उदयाला आलं - संविधान. त्यामुळे संविधान (बहुमताने नित्य नूतन होणारं) जे सांगतं ते सामाजिक नीती-नियम हा आजचा धर्म आहे. उपसनापद्धती वेगळी असू शकते आणि ती वैयक्तिक/घरापुरती मर्यादित असावी. संविधानापुढे कोणताही धर्मग्रंथ अधिक प्रधान्याचा असणार नाही. हिंदूंमध्येच "वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्" हे गीत प्रसिद्ध होऊ शकलं आहे. हेच हिंदुत्व आहे. ज्यात काळाबरोबर बदलण्याची क्षमता आहे.

संघाचं हिंदुत्व हे
- सर्वसमावेशक, सर्वव्यापी
- सुधारणेला कायम वाव असलेलं
- नित्य नूतन (काळाबरोबर, काळानुसार नवीन बाबी मान्य करणारं)
- भारतीय वारसा जपणारं
- आक्रमकांशी झुंज देणारं
- राष्ट्रप्रथम मानणारं
असं आहे!

१.
हिन्दु जगे तो विश्व जगेगा मानव का विश्वास जगेगा
भेद भावना तमस हटेगा समरसता अमृत बरसेगा
हिन्दु जगेगा विश्व जगेगा ।।धृ।।

हिन्दु सदा से विश्व बन्धु है जड चेतन अपना माना है
मानव पशु तरु गीरी सरीता में एक ब्रम्ह को पहचाना है
जो चाहे जिस पथ से आये साधक केन्द्र बिंदु पहुचेगा ॥१॥

इसी सत्य को विविध पक्ष से वेदों में हमने गाया था
निकट बिठा कर इसी तत्व को उपनिषदो में समझाया था
मन्दिर मठ गुरुद्वारे जाकर यही ज्ञान सत्संग मिलेगा ॥२॥

हिन्दु धर्म वह सिंधु अटल है जिसमें सब धारा मिलती है
धर्म अर्थ ओर काम मोक्ष की किरणे लहर लहर खिलती है
इसी पूर्ण में पूर्ण जगत का जीवन मधु संपूर्ण फलेगा ॥३॥

इस पावन हिन्दुत्व सुधा की रक्षा प्राणों से करनी है
जग को आर्यशील की शिक्षा निज जीवन से सिखलानी है
द्वेष त्वेष भय सभी हटाने पाञ्चजन्य फिर से गूंजेगा ॥४॥

२.
जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥

कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या
अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या
भेद भेदुनि भिंती पाडुनि समरसता ती आणूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥

ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी
कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥

कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु
कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु
उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥

३.
हिन्दु हिन्दु एक रहे भेद भाव को नही सहे
संघर्षो से दुखी जगत को मानवता की शिक्षा दे ॥धृ॥

एक ब्रह्म कुछ और नही हरिहर दुर्गा मात वही
देव देविया रूप उसीका देश काल अनुसार सही
सब पन्थों का मान करे सब ग्रंथो से ग्यान गहे
सद्गुरूओं की सीख समझकर जीवन को जीना सीखे ॥१॥

जो भाई भटके बिछडे हाथ पकड ले साथ चले
भोजन कपडा घर की सुविधा शिक्षा सबको सुलभ रहे
उंच-नीच लवलेश न हो छुवा-छूत अवशेष न हो
एक लहू सब की नस-नस मे अपनेपन की रीत गहे ॥२॥

धर्म प्रेम अमृत पीये गीता गंगा गौ पूजे
वेद विहीत जीवन रचना हो राम कृष्ण शिव भक्ति करे
धर्म सनातन अनुगामी बुद्धम्-शरणम्-गच्छामि
अर्हंतोंको नमन करे नित वाहे गुरु अकाल कहे ॥३॥

४.
हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या
धरती-नभ-पातळहि भारु प्राण पणाला लावूया ॥धृ॥

उच्चनीचता तण जाळावे धगधगत्या कर्तृत्वाने
समाज रसरसता अर्वाचिन पुनः निर्मुया यत्नाने
खचलेला अभिमान जागवू पिचली हृदये सांधूया ॥१॥

कोणी नाही शत्रू आपूला प्रेमाने अवकाश भरु
चारित्र्याच्या आधारावर हिंदूराष्ट्र हे नव उभवू
समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवूया ॥२॥

सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा लाभावा
अन्न-वस्त्र-संस्कार लाभही सहजपणे सर्वा लाभावा
हीच एकता, समता, ममता, पथ ऐक्याचा चालूया ॥३॥

निज सत्वाची जाणिव नसता राष्ट्रजीवनी अर्थ नसे
परंपरा, इतिहास, पराक्रम आठव नुसाता व्यर्थ असे
कोटी मनांना सवे घेऊनी वैभव सारे मिळवू या ॥४॥

समाजभक्ति हीच प्रेरणा राष्ट्रभक्ति हे रुप तिचे
देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तिचे
विचार येतील अमरत्वाचे सर्व जगाला देऊया ॥५॥

आज कसोटी पुरुषार्थाची, व्यक्तित्वाच्या समर्पणाची
माय भूमीच्या पायी वाहू ओंजळ निज कर्तृत्वाची
अग्निपरिक्षा कोणी घेता सुवर्ण तेजे तळपुया ॥६॥

Tuesday, December 10, 2019

भीती कायद्याची की पोलिसांची

शीर्षटीप - बलात्काऱ्यांना कायद्यात असलेली सर्वात मोठी शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. शक्य असेल तर कायद्यात बदल करून गुन्हेगाराला लिंग कापून, चौरंगा करावं असं माझं मत आहे.

हैदराबाद येथील घटनेने मन सुन्न झालं होतं. अशा घटना घडल्या की त्रास होतोच. या केसमध्ये आरोपी लवकर पकडले गेले आणि ते पोलिसांवर हल्ला करून पळून जात असताना पोलिसांना नाईलाजाने त्यांना मारावं लागलं.

घटना घडल्यानंतर आणि आज एन्काऊंटर ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपण सगळे एक समाज म्हणून किती खालच्या इयत्तेत आहोत हे अधोरेखित करतात. सुरुवात आजच्या एन्काऊंटरवरून करूया.

मुद्दा १:
कायदा भारतात नाहीच अशा पद्धतीने कित्येक लोक (ह्यात अनेक मोठे नेते, कलाकार, खेळाडू - एकूण जनमानसावर प्रभाव टाकणारे सुद्धा आहेत) व्यक्त होत आहेत. वास्तविक अशा माणसांमुळे आधीच व्यवस्थेवर कमी विश्वास असलेल्या आपल्या समाजाला व्यवस्थेपासून आपण दूर नेत आहोत हे यांच्या लक्षात येत नाहीये. सरकार, GOD FATHER, अब तक छप्पन सारखी समांतर व्यवस्था आपल्याला उभी करायची नसून मूळ व्यवस्थेला सक्षम करायचे आहे. व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी नक्षलवादी आहेच. जर असा न्याय आपण स्वीकारत असू तर नक्षलवादही स्वीकारू. आपली निवड सक्षम व्यवस्था असली पाहिजे, सक्षम अधिकारी आपोआप तयार होतील. पण जर व्यवस्थेपेक्षा अधिकारी मोठे ठरत असतील तर व्यवस्था कधीच सक्षम होणार नाही.

या एन्काऊंटरच्या अनेक शक्यता असू शकतात.
१. खरंच आरोपी हल्ला करून पळणार होते, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला.
२. मृतदेह जाळल्यामुळे न्यायवैद्यक चाचणीत बलात्काराचा पुरावा मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले असू शकते.
३. आरोपींमधील बहुदा दोन आरोपी स्वतःला "बाल" म्हणवून घेत असावेत. दिल्लीतील आरोपीप्रमाणे हेही सुटतील असं वाटल्याने पोलिसांनी त्यांना मारलं असावं.
४. कुणीतरी वेगळीच माणसे या केस मध्ये गुंतलेली असावीत. (एका ऐकीव माहितीनुसार पीडित स्वतः पशुवैद्य असल्याने अवैध कत्तलखान्याविरोधात होती. त्यामुळे तिची सुपारी दिलेली असू शकते) अशी नावं बाहेर येतील आणि ते पोलिसांना आणि प्रशासनाला परवडणारे नसेल. यांना मारलं तर सगळी केसच बंद करता येईल.
यापैकी यापुढे केवळ पहिली शक्यता गृहीत धरण्यात येईल आणि फाईल बंद होईल...


 आपल्याला या एन्काऊंटरचा आनंद का होतो -
दिल्लीतील केसमध्ये येत्या काही दिवसात फाशीचा दिवस ठरेल पण तिथे शिक्षा द्यायला जल्लाद उपलब्ध नाही. कठुआ केस अजूनही तपासातच आहे. उन्नाव केस मध्ये आरोपींनी पीडितेसह तिचे कुटुंबच मारून टाकले आहे. कोपर्डी केसमध्ये शिक्षा जाहीर झाली पण अजून त्यापुढील कोणतीच कारवाई नाहीये. केरळमधील ननची तर केस पुढेच गेलेली नाही. तो बिशप सुखेनैव धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतोय. या फक्त माहित असलेल्या केसेस आहेत. माहित नसलेल्या हजारो केसेस असतील आणि न नोंदलेल्या तर त्याच्या कित्येक पट...! न्याय देण्यात आणि त्याची अंमलबजावणी होण्यात कित्येक वर्षं निघून जातात. यामुळे अशी एखादी घटना घडली कि त्याचा आनंद होतो.
पण हे लक्षात येत नाही की यातून आपली आधीच कमकुवत असलेली व्यवस्था अधिक कमकुवत होत जाते. गुन्हेगाराला न्यायव्यवस्थेची भीती वाटली पाहिजे, पोलिसांची नाही.





मुद्दा २:
आपण एक समाज म्हणून खरंच चांगले आहोत का? कारण हैदराबाद पीडितेवर केवळ याच चार नराधमांनी बलात्कार केला नाही. त्यांच्याशिवाय अजून ८० लाख लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. ८० लाख लोकांनी तिचं नाव पॉर्न साईटवर शोधलं. हे सगळे आपल्याच समाजातील लोक आहेत. अजून किती अधःपतन व्हायचं आहे. जर एन्काऊंटर करणे हाच न्याय असेल तर या ८० लाखांनासुद्धा मारले पाहिजे. एखादीवर बलात्कार होतोय आणि तो पाहावा वाटतो ही कसली विकृती आहे. हे लोक संधी मिळत नाही म्हणून प्रत्यक्ष कृती करत नाहीयेत. यांनाही जर संधी मिळाली तर ते नक्कीच बलात्कार करतील.
मुळात बलात्कार हा रोग (disease) नाहीये, ते लक्षण (symptom) आहे. रोग वेगळाच आहे. अजूनही रोग काय आहे ते कळालं नाहीये. काही लोक जेव्हा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यापासून रोखलं जातं. या गुन्हेगारांना भेटून ही मानसिकता आली कुठून हा शोध घेतला गेला पाहिजे. पण प्रशासन भेटच होऊ देत नाहीत असे अनुभव आहेत.

मुद्दा ३:
सरसकटीकरण आणि धार्मिक/जातीय विभाजन - कठुआ केसच्या वेळी अनेकांनी सरसकट हिंदूंना, देवालयांना आणि देवतांना पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्याबद्दल लिहिताना मी लिहिलं होतं ( http://dnyanamhane.blogspot.com/…/i-am-not-ashamed-to-be-hi… )

- लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)
हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

हे टिपिकल फुर्रोगामी लोकांबद्दल होतं. ते असतात सिलेक्टिव्ह. पण त्यांना सिलेक्टिव्ह म्हणणारे स्वतःच किती सिलेक्टिव्ह होताहेत हे गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं आणि त्याचं वाईट वाटलंय.

Quint सारख्या नाठाळ मीडियावीर त्या पाशाची गरिबी दाखवतात आणि मग विरोधी सूर अधिक भेसूरपणे असा न्याय मागतो.

दिल्ली केस मध्ये मोहम्मद अफरोज "नाबालिक" असल्याने ३ वर्षात सुटला त्याबद्दल हिरीरीने लिहिलं जातं. पण उर्वरित ३ गुन्हेगार अजूनही जिवंत आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं जात नाही. उन्नाव केसमध्ये कुणी फार बोलत नाही. आत्ताही चार पैकी दोन आरोपी हिंदू आणि दोन मुस्लिम होते. त्यातील फक्त मोहम्मद पाशा बद्दल बोललं जात होतं. पण जे "नाबालिक" म्हणून सुटण्याची शक्यता होती, त्यातील एक हिंदू होता. त्याचं नावही कोणत्या "पोष्टी"त दिसलं नाही. शिवाय "त्यांच्यात" हे "जायज" असतं अशाही पोस्ट्स दिसल्या / whatsapp वर फिरल्या. हा दुतोंडीपणा फुर्रोगाम्यांचा आहे, तो आता या स्वघोषित हिंदुत्ववाद्यांमध्येही येत आहे ही वाईट बाब आहे.

आज संविधानकर्त्या डॉ आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ आंबेडकर म्हणाले होते की एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे व्यक्ती असक्षम असतील तर लोकशाही अपयशी ठरते. पोलिसांनी खरंच नाईलाज म्हणून गोळीबार केला असेल तरी दुर्दैवाने आज ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून समाज म्हणून आपण अपयशी होत आहोत हेच अधोरेखित होत आहे.

आपल्या देशाच्या व्यवस्था सक्षम होणं आणि त्यावर सर्व समाजाचा विश्वास असणं हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल.