मागील काही दिवसांत प. पू. सरसंघाचालकांच्या सैनिक, सर्वसामान्य आणि संघ स्वयंसेवक भारतीय यावर बरीच चर्चा झाली. काहींनी प्रश्न विचारले, काहींनी विनोद तयार केले, तर ज्यांनी तयार संघटना मोडून आपली संघटना उभी केली, पण ती धड नऊ वर्षे सांभाळता आली नाही त्यांनी नव्वद वर्षांहून अधिक वय असलेल्या संघटनेवर व्यंगचित्र काढून आपली भडास काढली. या सगळ्यातून विरोध न दिसता द्वेष दिसून आला.
संघ तीन दिवसांत युद्धजन्य परिस्थितीत स्वयंसेवकांना युद्धसज्ज कसे करू शकतो? हा यातील मुख्य प्रश्न. युद्धसज्ज असणे म्हणजे बंदुका घेऊन थेट सीमेवर जाणे असे नसते. सैन्याची अनेक अन्य कामे असतात. ती हलकी केली तरी सैन्याला प्रचंड मदत होऊ शकते. सैन्यासाठी जेवण बनवण्यापासून ते सैनिक रुग्णसेवा करेपर्यंत. पण त्यात आत्मीयता आणि शिस्त असावी लागते जी स्वयंसेवकांमध्ये असते, याची मोहनजींना खात्री आहे.
अनेकांनी स्वयंसेवकांनी युद्धजन्य परिस्थितीत कुठे, कसं आणि काय काम केलं याचे अनेक दाखले दिले. पण युद्धजन्य परिस्थिती नसताना तयारी कशी होते याचं मी अनुभवलेलं उदाहरण देतो. सुमारे वीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. पहाटे सव्वा चार वाजता दार वाजलं. "साडेपाचला शहरसंघचालकांच्या घराजवळील संघस्थानावर अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांचे एकत्रीकरण आहे" हा निरोप मिळाला. मी एका शाखेचा कार्यवाह होतो. सर्व तरुण गटनायकांना निरोप दिला. त्यांनी आपापल्या गटात निरोप दिले आणि साडेपाचला पाचशेहून अधिक तरूण संघस्थानावर आले. शाखा लागली. संघचालकांनी आपण केवळ दीड तासात पाचशे+ स्वयंसेवक एकत्र येऊ शकलो त्याबद्दल समाधान व्यक्त केले. कधीही जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर आपण असेच लवकर एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करू असे सांगितले. प्रार्थना झाली आणि सर्व घरी पोहोचले.
वीस वर्षांपूर्वी मोबाईल काय, प्रत्येकाकडे घरी फोन सुद्धा नव्हते. पण खालील गोष्टी स्वयंसेवकांत होत्या
१. निरोप कसा पोहोचवायचा याची शिस्त. संघचालक - दोन भाग कार्यवाह - प्रत्येकी पाच नगर कार्यवाह - प्रत्येकी सुमारे ३, ४ तरूण शाखांचे कार्यवाह - प्रत्येकी ५, ६ तरूण गटनायक - प्रत्येकी ८, १० तरूण स्वयंसेवक. या प्रकारे एका तासात निरोप प्रत्यक्ष भेटून दिला गेला.
२. नेतृत्वावर विश्वास - कुणीही, का बोलावले, ही काय वेळ आहे का... विचारले नाही. संघचालकांनी बोलावले ते काहीतरी काम असेल म्हणून बोलावले असेल. तिथे गेलं की कळेलच. घरच्यांनाही सहज जाऊ दिले कारण त्यांनी संघ पेपरातून, टीव्हीवरून समजावून घेतला नव्हता तर अनुभवला होता.
३. निरोप नेमका पोहोचवणे - या एकत्रीकरणात कुणीही बाल किंवा ४५+ स्वयंसेवक आले नव्हते.
वीस वर्षांपूर्वी मोबाईल काय, प्रत्येकाकडे घरी फोन सुद्धा नव्हते. पण खालील गोष्टी स्वयंसेवकांत होत्या
१. निरोप कसा पोहोचवायचा याची शिस्त. संघचालक - दोन भाग कार्यवाह - प्रत्येकी पाच नगर कार्यवाह - प्रत्येकी सुमारे ३, ४ तरूण शाखांचे कार्यवाह - प्रत्येकी ५, ६ तरूण गटनायक - प्रत्येकी ८, १० तरूण स्वयंसेवक. या प्रकारे एका तासात निरोप प्रत्यक्ष भेटून दिला गेला.
२. नेतृत्वावर विश्वास - कुणीही, का बोलावले, ही काय वेळ आहे का... विचारले नाही. संघचालकांनी बोलावले ते काहीतरी काम असेल म्हणून बोलावले असेल. तिथे गेलं की कळेलच. घरच्यांनाही सहज जाऊ दिले कारण त्यांनी संघ पेपरातून, टीव्हीवरून समजावून घेतला नव्हता तर अनुभवला होता.
३. निरोप नेमका पोहोचवणे - या एकत्रीकरणात कुणीही बाल किंवा ४५+ स्वयंसेवक आले नव्हते.
हे स्वयंसेवकांत का असते याचे उत्तर देणे खूप अवघड आहे. ती प्रत्यक्ष संघस्थानावर जाऊन अनुभव घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे शाखामे आओ, सब जान जाओ।
माझे जे मित्र संघद्वेषी आहेत त्यांना माझे एकच सांगणे आहे. तुम्ही द्वेषी होऊ नका. तुम्हाला संघ आवडत नाही तर विरोधी रहा. तुमच्या मते संघ द्वेष पसरवतो, मग तुम्ही प्रेम पसरवा. कारण तुम्ही स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणवता. द्वेष केल्याने द्वेषच वाढेल. एवढं केलंत तरी आनंद होईल. स्वयंसेवक तुमचा द्वेष नक्की करणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही निश्चितच एक भावी स्वयंसेवक आहात
दि. १७ फेब्रुवारी २०१८
No comments:
Post a Comment