Monday, March 19, 2018

विज्ञान आणि अध्यात्म

विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरू होते, आणि विज्ञानाच्या कक्षा सतत रुंदावत आहेत...

#कुणीसं
दि. ९ जुलै २०१६

नीती आणि नियम

साधारण बोलताना नीतीनियम असा शब्द बऱ्याचदा वापरतात. केवळ नीतीने वागून गोष्टी पूर्ण होत नाहीत आणि केवळ नियमांना बांधूनही. म्हणून नीतीनियम ही जोडी आहे.
रामायणाच्या काळात नियम बनत असावेत आणि नीतिमत्ता निश्चित झाली होती. राम वागणुकीतून नीतीला नियमात बसवत होते. रावण हा नियमापासून दूर होताच नीतीशीही त्याचा संबंध नव्हता. तर राम म्हणजे नीती आणि नियम दोन्ही उत्तमपणाने पाळणारे होते.
महाभारताच्या काळात नियम घट्ट बनलेले होते. आपण दुर्योधनाने केलेली प्रत्येक कृती बघितली तर ती नियमांना धरून आहे. मग लक्षागृह ते द्यूत ते अंतिम लढाई. कुठेही त्याने नियम मोडला नाही. पण नीती, ती मात्र नियमांमध्ये हरवली. तर दुसऱ्या बाजूला कृष्ण. लहानपणी लोण्याची चोरी करण्यापासून ते द्रौपदीस्वयंवरात कर्णाला उतरू न देणे, जारासंधाचा भिमाकरवी वध, जयद्रथाला मारण्यासाठी सूर्यग्रहण, कर्णाला निःशस्त्र असताना मारावयास सांगणे, भीमाला गदायुद्धात दुर्योधनाच्या कमरेखाली वार करायला सांगणे अश्या अनेक गोष्टी ज्या नियमबाह्य होत्या त्या केल्या. पण या सर्वांत नीती सोडली नाही.
नियम हे नीतीला पूर्णत्व देण्यासाठी, सर्वसामान्यांना सहज नीतीवान होता यावे म्हणून असतात. त्यात नीती हरवली नाही पाहिजे.
जय श्रीराम, जय श्रीकृष्ण!!!

दि. १५ एप्रिल २०१६

शिखर

आयुष्याच्या अंतापर्यंत शिखरावर पोहोचूच नाही
एकतर प्रवास थांबतो
किंवा अधोगती सुरू होते...

किंवा

मला शिखरावर कधीच पोहोचायचे नाही, कारण प्रवास कधीच थांबत नसतो

#कुणीसं

दि. २५ मार्च २०१६

कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो

कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
पुरातन भारत की विश्व में एक पहचान हो
लाज रखे जो दुनिया की वो सबसे बड़ा तुम फूल हो
बुनियादि जरूरतो में अ-व-नि का तुम मध्य हो
हर शरीर की लाज ढके ऐसा तुम वस्त्र हो
इचलकरंजी में तुम, सोलापूर चादर में तुम
बम्बई की मीलो से लेके मैंचेस्टर फैक्ट्रिया हो तुम
बापू की धोती भी तुम, बापू का पंचा भी तुम
बापू के चरखे से निकला, हर एक धागा भी तुम
दादी माँ की साडी हो, दादाजी का जनेवा हो
भगवान के सामने दिए में जलने वाली बाती हो
किसानो से ख़रीदा जाये तो चालीस रुपये किलो हो तुम
मॉल की दुकानो में हजार का सौ ग्राम तुम
विदर्भ को मिली तुमसे सफ़ेद सोने की पहचान
आज की तारीख में हैरान है सारे किसान
धागा जब आड़ा मिले तो उसका कपड़ा बने
धागा जब खड़ा गुंफे तो उसकी ही डोर बने
उसी डोर से बना पेड़ो पर झूला हो तुम और...
उसी डोर से बना किसान का फंदा हो तुम
कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिए तुम कौन हो

दि. ३० जानेवारी २०१६

कृष्ण, इंद्र आणि गोवर्धन

एक नुकताच टीनएज मध्ये आलेला मुलगा असतो. खोडकर, बंडखोर. गावात पावसापाण्यासाठी दर वर्षी पूजा घातली जात असते. त्याला काही हे पटत नसतं. तो असतो गावाच्या सरपंचाचा मुलगा. एका वर्षी तो पूजा घालू देत नाही. ना पूजा, ना बळी... नेमकं त्याच वर्षी दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात होते. लोक घाबरतात. सरपंचाला म्हणतात आपण पूजा केली नाही, म्हणून हे होतंय. दोन दिवसांत नदीला जोरात पूर येतो. आता मात्र सरपंचपण घाबरतात. पण मुलगा हट्टी असतो. तो म्हणतो, “पाऊस देव धाडत नाही, पूजेमुळे पण पडत नाही. डोंगर, झाडे, जंगले यामुळे पडतो.” वडील म्हणतात, “मग आता तो डोंगर वाचवेल का आपल्याला?” मुलगा चॅलेंज घेतो. व्रात्य असतोच त्यामुळे डोंगरवाटा, कपारी, गुहा यांची इत्यंभूत माहिती असते. तो सगळ्या गावकर्‍यांना, गायी-गुरांना घेऊन डोंगरातल्या मोठ्या गुहेत घेऊन जातो आणि पाऊस पूर कमी झाला की सगळे परत येतात. शेवटी गावकर्‍यांना मुलाचं विज्ञानवादी, तर्कशुद्ध म्हणणं पटतं.
पुढे या मुलाचा मित्र ऐन युद्धाच्या वेळी हातपाय गळतो. त्याला बरंच काही सांगून, शिकवून हा त्याला युद्ध करायला लावतो, मदत करतो. पण त्या सांगण्यात आणि आधीच्या टीनएज वाल्या मुलाच्या सांगण्यात विसंगती आहे.
अन्नापासूनि ही भूते पर्जन्यातुनि अन्न ते |
यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे || गीताई ३ – १४ ||
मग काही प्रश्न पडतात
१. आधीचा मुलगा आणि नंतरचा मोठा माणूस एकच की वेगवेगळे?
२. मोठं झाल्यावर लोकानुनयी सांगावं असं काही असतं का?
३. काहीही करून याला युद्धाला उभं करणं आवश्यक आहे. म्हणून त्याला जसं पटू शकेल तसं सांगायचं होतं का?
४. हे गीतेमध्ये नंतर कुणीतरी घातले का?
५. की आणखी काही...


दि. १७ जानेवारी २०१६

आर्द्रता

धुकं जाऊन ढग आले
तेव्हा मला पाऊस काय ते कळालं
नाहीतर आर्द्रता आधीही मिळत होतीच की...
#कुणीसं
दि. ४ जानेवारी २०१६