शस्त्रात ताकद नसते, ताकद असते ते शस्त्र धारण करणाऱ्या हातात. पण खरंतर हातातही ताकद नसते, ती असते कणखर मनात. जेव्हा मन कणखर नसते तेव्हा संत तुकारामांनी सांगितलेल्या रडक्या माणसाप्रमाणे हाल होतात.
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी जुंझार कैसा झुंजो ।।
पोटी पडदाळे सिले टोप ओझे । हे तो झाले दुजे मरणमूळ ।।
बैसविले मला येथे अश्वावरी । धावू पळू तरी कैसे आता ।।
असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हाय हाय काय करू ।।
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ।।
माझे हात ढाल आणि तलवार यांना धरण्यात गुतंले आहेत, मी लढू कसा असा त्याला प्रश्न पडतो. पायाला पोटीस बांधलंय आणि डोक्यावर सिले टोप आहे, त्याचं मला ओझंच होतंय. मला घोड्यावर बसवलेलं असल्याने मला पळणेही शक्य नाहीये. असा विचार करणारा जे उपाय आहेत त्यालाच अपाय समजतोय आणि हाय हाय करत काहीही करू शकत नाही.
२६-११ ला जेव्हा मुंबईवर हल्ला झाला किंवा त्या दरम्यान जेवढे घातपाती हल्ले झाले तेव्हाही आपली सेना हीच होती, एवढीच सक्षम होती. म्हणजे ढाल-तलवार-पोटी-पडदाळे आणि घोडा होताच. म्हणजे शस्त्रे होती, विमाने होती. ती धरणारा हात म्हणजे प्रत्यक्ष सैनिक सुद्धा होते. ते आज जेवढे सक्षम आहेत तेवढेच सक्षम होते. पण "कडी निंदा" करण्यापलीकडे काहीच झालं नाही. कारण या शस्त्रामागे - हातामागे जे मन होतं ते कमकुवत होतं. उरी नंतरचा सर्जिकल स्ट्राईक असो की आज झालेला एअर स्ट्राईक यात सेनादलाचे श्रेय आहेच. ते असलंच पाहिजे. पण त्या बलदंड सेनेमागे जे कणखर मन आहे ते सध्याच्या सरकारचे आहे.
मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद ।
या ओळीचा अर्थ आज पुन्हा एकदा भारतीय वायुसेनेने आणि भारतीय सरकारने दाखवून दिला!!!
शतशः नमन _/\_
#SurgicalStrike2
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी जुंझार कैसा झुंजो ।।
पोटी पडदाळे सिले टोप ओझे । हे तो झाले दुजे मरणमूळ ।।
बैसविले मला येथे अश्वावरी । धावू पळू तरी कैसे आता ।।
असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हाय हाय काय करू ।।
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ।।
माझे हात ढाल आणि तलवार यांना धरण्यात गुतंले आहेत, मी लढू कसा असा त्याला प्रश्न पडतो. पायाला पोटीस बांधलंय आणि डोक्यावर सिले टोप आहे, त्याचं मला ओझंच होतंय. मला घोड्यावर बसवलेलं असल्याने मला पळणेही शक्य नाहीये. असा विचार करणारा जे उपाय आहेत त्यालाच अपाय समजतोय आणि हाय हाय करत काहीही करू शकत नाही.
२६-११ ला जेव्हा मुंबईवर हल्ला झाला किंवा त्या दरम्यान जेवढे घातपाती हल्ले झाले तेव्हाही आपली सेना हीच होती, एवढीच सक्षम होती. म्हणजे ढाल-तलवार-पोटी-पडदाळे आणि घोडा होताच. म्हणजे शस्त्रे होती, विमाने होती. ती धरणारा हात म्हणजे प्रत्यक्ष सैनिक सुद्धा होते. ते आज जेवढे सक्षम आहेत तेवढेच सक्षम होते. पण "कडी निंदा" करण्यापलीकडे काहीच झालं नाही. कारण या शस्त्रामागे - हातामागे जे मन होतं ते कमकुवत होतं. उरी नंतरचा सर्जिकल स्ट्राईक असो की आज झालेला एअर स्ट्राईक यात सेनादलाचे श्रेय आहेच. ते असलंच पाहिजे. पण त्या बलदंड सेनेमागे जे कणखर मन आहे ते सध्याच्या सरकारचे आहे.
मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद ।
या ओळीचा अर्थ आज पुन्हा एकदा भारतीय वायुसेनेने आणि भारतीय सरकारने दाखवून दिला!!!
शतशः नमन _/\_
#SurgicalStrike2
No comments:
Post a Comment