इतिहास हे शास्त्र आहे. एखादे 'मत' इतिहास म्हणून मांडणे किंवा इतिहास म्हणून स्वीकारणे हे दोन्ही चूक.
उदाहरण म्हणून महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकातील एक परिच्छेद देत आहे. यातील एकूण एक वाक्य अनैतिहासिक आहे.
1. महंमद पैगंबरांच्या जहामर्द शिष्यांनी सोमनाथ शेतकऱ्यांची भट ब्राह्मणापासून सुटका करण्यासाठी फोडले नाही. ते फोडले लूट करण्यासाठी आणि इस्लामचा प्रसार करण्यासाठी. त्यांना येथील शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नव्हते
2. ज्ञानोबांनी भागवत बखरीतील कल्पित भाग उचलून ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ती लिहिली गीतेवरून. गीतेत इस्लामच्या विरोधी काही असण्याची शक्यता नाही कारण गीता इस्लामच्या हजारो वर्षे आधी लिहिली गेली. गीतेशिवाय अन्य धर्मकारण/राजकारण या कशावरही ज्ञानेश्वरांनी काही लिहिले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरांमुळे शेतकरी मुस्लिमांना नीच मानू लागले हे चुकीचे आहे
3. तुकाराम नावाचा साधू शेतकऱ्यांत निर्माण झाला, हे धादांत खोटे वाक्य आहे. तुकाराम शेतकरी नव्हते, सावकार होते. त्यांनी सावकारी सोडल्यावर शेती केली. शिवाजी महाराज देखील 3 पिढ्यांपासून शेतकरी नव्हते तर सरदार होते.
4. पुढील वाक्यात महाराजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे. ज्यांना मराठी, संस्कृत, फार्सी या भाषा व्यवस्थित अवगत होत्या, ज्यांनी आपली राजमुद्रा संस्कृत मधून तयार करवून घेतली अशा शिवाजी राजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे
5. पेशव्यांनी शाहू आणि पुढील राजांना साताऱ्यास कैदेत ठेवले हे म्हणणे इतिहासाचे अज्ञानच दर्शवते. बाळाजी विश्वनाथांपासून, बाजीराव, नानासाहेब, माधवराव ते अगदी ज्याला पळपुटा म्हणतात (यावर सुद्धा प्रतिवाद आहेत) त्या दुसऱ्या बाजीरावांपर्यंत सर्वांनी सातारच्या गादीशी इमान राखले आणि पूर्ण मान दिला.
हे सगळं जोतिरावांनी का लिहिलं असावं? कारणं अनेक असू शकतात. उदा:
1. त्यांचं शिक्षण इंग्रजांच्या शाळेत झालं होतं. त्यामुळे आर्य भारतात आले आणि त्यांनी मूलनिवासी लोकांवर अत्याचार केले हे त्यांच्यावर बिंबवले गेले. आर्य म्हणजे केवळ ब्राह्मण आणि इतर सर्व शेतकरी हा शोध असाच लादला असेल. (डॉ आंबेडकरांनी यावर प्रतिवाद करून हे चुकीचे आहे हे सिद्ध केले आहे)
2. जेव्हा गोविंदराव (वडील) यांनी रुढीवाद्यांना घाबरून, किंवा त्यांचं ऐकून जोतिरावांना घरातून काढलं तेव्हा फातिमा आणि उस्मान शेख या बहीण भावांनी त्यांना आपल्या घरात जागा दिली. कदाचित त्यामुळे इस्लाम बद्दल प्रेम निर्माण झाले असावे.
कारणं काहीही असली तरी आधी निष्कर्ष आणि मग पुरावे अशा पद्धतीने हे लिखाण झालेले आहे. जोतिरावांचे कार्य महान आहे. ते महात्मा आहेतच. पण त्यामुळे त्यांनी सांगितलेली, लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के बरोबर असलीच पाहिजे असे नाही. चुकून असेल, त्यावेळची गरज असेल किंवा काहीही या महात्म्याकडून दुहीचे बी पेरले गेले. आणि आज त्या वृक्षाला फळं आली आहेत ही खेदाची बाब आहे. असो!
मुद्दा असा की इतिहास हे मत नसते, जे खरोखरीच झाले आहे तो इतिहास असतो. कधी सगळे पुरावे एकत्र मिळतात कधी सुटे सुटे. ते सगळे जोडून इतिहास सिद्ध होतो. त्यात कधी जुने सिद्धांत खोडले जातात तर कधी ते अधिक सिद्ध होतात.

दि. २६ जुलै २०१७
उदाहरण म्हणून महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकातील एक परिच्छेद देत आहे. यातील एकूण एक वाक्य अनैतिहासिक आहे.
1. महंमद पैगंबरांच्या जहामर्द शिष्यांनी सोमनाथ शेतकऱ्यांची भट ब्राह्मणापासून सुटका करण्यासाठी फोडले नाही. ते फोडले लूट करण्यासाठी आणि इस्लामचा प्रसार करण्यासाठी. त्यांना येथील शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नव्हते
2. ज्ञानोबांनी भागवत बखरीतील कल्पित भाग उचलून ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ती लिहिली गीतेवरून. गीतेत इस्लामच्या विरोधी काही असण्याची शक्यता नाही कारण गीता इस्लामच्या हजारो वर्षे आधी लिहिली गेली. गीतेशिवाय अन्य धर्मकारण/राजकारण या कशावरही ज्ञानेश्वरांनी काही लिहिले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरांमुळे शेतकरी मुस्लिमांना नीच मानू लागले हे चुकीचे आहे
3. तुकाराम नावाचा साधू शेतकऱ्यांत निर्माण झाला, हे धादांत खोटे वाक्य आहे. तुकाराम शेतकरी नव्हते, सावकार होते. त्यांनी सावकारी सोडल्यावर शेती केली. शिवाजी महाराज देखील 3 पिढ्यांपासून शेतकरी नव्हते तर सरदार होते.
4. पुढील वाक्यात महाराजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे. ज्यांना मराठी, संस्कृत, फार्सी या भाषा व्यवस्थित अवगत होत्या, ज्यांनी आपली राजमुद्रा संस्कृत मधून तयार करवून घेतली अशा शिवाजी राजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे
5. पेशव्यांनी शाहू आणि पुढील राजांना साताऱ्यास कैदेत ठेवले हे म्हणणे इतिहासाचे अज्ञानच दर्शवते. बाळाजी विश्वनाथांपासून, बाजीराव, नानासाहेब, माधवराव ते अगदी ज्याला पळपुटा म्हणतात (यावर सुद्धा प्रतिवाद आहेत) त्या दुसऱ्या बाजीरावांपर्यंत सर्वांनी सातारच्या गादीशी इमान राखले आणि पूर्ण मान दिला.
हे सगळं जोतिरावांनी का लिहिलं असावं? कारणं अनेक असू शकतात. उदा:
1. त्यांचं शिक्षण इंग्रजांच्या शाळेत झालं होतं. त्यामुळे आर्य भारतात आले आणि त्यांनी मूलनिवासी लोकांवर अत्याचार केले हे त्यांच्यावर बिंबवले गेले. आर्य म्हणजे केवळ ब्राह्मण आणि इतर सर्व शेतकरी हा शोध असाच लादला असेल. (डॉ आंबेडकरांनी यावर प्रतिवाद करून हे चुकीचे आहे हे सिद्ध केले आहे)
2. जेव्हा गोविंदराव (वडील) यांनी रुढीवाद्यांना घाबरून, किंवा त्यांचं ऐकून जोतिरावांना घरातून काढलं तेव्हा फातिमा आणि उस्मान शेख या बहीण भावांनी त्यांना आपल्या घरात जागा दिली. कदाचित त्यामुळे इस्लाम बद्दल प्रेम निर्माण झाले असावे.
कारणं काहीही असली तरी आधी निष्कर्ष आणि मग पुरावे अशा पद्धतीने हे लिखाण झालेले आहे. जोतिरावांचे कार्य महान आहे. ते महात्मा आहेतच. पण त्यामुळे त्यांनी सांगितलेली, लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के बरोबर असलीच पाहिजे असे नाही. चुकून असेल, त्यावेळची गरज असेल किंवा काहीही या महात्म्याकडून दुहीचे बी पेरले गेले. आणि आज त्या वृक्षाला फळं आली आहेत ही खेदाची बाब आहे. असो!
मुद्दा असा की इतिहास हे मत नसते, जे खरोखरीच झाले आहे तो इतिहास असतो. कधी सगळे पुरावे एकत्र मिळतात कधी सुटे सुटे. ते सगळे जोडून इतिहास सिद्ध होतो. त्यात कधी जुने सिद्धांत खोडले जातात तर कधी ते अधिक सिद्ध होतात.

दि. २६ जुलै २०१७
No comments:
Post a Comment