Tuesday, March 20, 2018

शिवाजी महाराजांचे मुस्लीम सरदार

सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही. ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले. संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
चूक - सिद्दी हिलाल हा एक सरदार होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता
शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
चूक - पहिले सरसेनापती नेताजी पालकर होते. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.
शिवाजी महाराजांबरोबरआग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर"
बरोबर. सोबत हिरोजी सुद्धा होता. मदारी होता की नाही यावर मत मतांतरे आहेत. अधिक माहितीसाठी पहा - https://m.facebook.com/dasabodh/posts/446234875521176:0
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
''काझी हैदर"
बरोबर. पण एकमेव नव्हता.
शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव ''मीर मोहम्मद"
चूक - महाराजांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत पण ती पॅरिस, पोर्तुगाल मध्ये आणि एक रशियात आहे
आणि
शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा… "रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान..!!!
बरोबर. पण वाघनख्या पाठवणारा नाही तर शस्त्र तयार करणारा एक कारागीर होता तो. त्याने केवळ अफझलखानाला मारायचे म्हणून वाघनखं बनवून दिली नव्हती
आता प्रश्न हा आहे की महाराजांच्या नावाने त्यांना बळेच मुस्लिम विरोधक नाही असं दाखवण्याचा प्रयत्न का केला जातो? कारण सोपं आहे, मूळ इतिहासापासून लोकांना दूर नेलं, की स्वत्व विसरायला लावणे सोपे असते. महाराज धर्म निरपेक्ष होते पण त्यांनी मशिदी पडल्या नाहीत असं मुळीच नाही. जी मशीद मंदिर तोडून बांधली गेली ती मशीद महाराजांनी पाडली आहे. हा इतिहास जाणीवपूर्वक लपवला जातो.
WhatsApp वर आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. स्वतः आधी पडताळून पहा आणि मगच forward करा. आपण महाराजांचा इतिहास विकृत तर करत नाही ना याचा विचार करा. देशातील अनेक ठिकाणच्या इतिहासाचं आधी इंग्रजांनी नंतर काँग्रेस आणि डाव्यांनी भरपूर वाटोळं केलं आहे. त्या पापात आपण सहभागी होऊ नका

दि. ७ मार्च २०१७

No comments:

Post a Comment