मी भैरवसिंग. उडान मधल्या रोहनचा बाप. मला त्यात उगाचच व्हिलन दाखवलं आहे.
माझ्याकडे वडिलोपार्जित काहीच नव्हते. माझा कारखाना मी सुरू केला. त्यात मेहेनतीने पैसा कमावला. माझा भाऊ, जिमी, त्याला शिकवलं. लग्न झाले. रोहन झाला पण त्याची आई लगेच वारली. काही दिवस रोहनला एकटं सांभाळायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही आणि खरं तर बायकोशिवाय मी राहणं मला अवघड होतं. त्याच्यावर सावत्रआईचा त्रास नको आणि त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून त्याला बोर्डिंगला पाठवलं. त्यानंतर लग्न केलं. दुर्दैवाने अर्जुन 5 वर्षांचा असताना त्याची आईही वारली. माझ्या दोन्ही बायका गेल्या पण माझं कुणी ना सांत्वन केलं ना मदत. बायकोच्या माहेरहून कोणी माझ्यावर कसलेही आरोप केले नाहीत हे माझं नशीबच म्हणावं लागेल.
रोहनला भेटायला मी काही वेळा बोर्डिंगला गेलो होतो. पण त्याला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आणि तोही त्याच्या मित्रांमध्ये खुश दिसला. फुटबॉल छान खेळत होता. चांगलं वाटलं. परत आलो. म्हटलं मुलगा मोठा होतोय, शिकेल आणि आपल्या मेहेनतीवर कमावेल.
पण अचानक त्याने दारू पिऊन धिंगाणा केला, मास्तरांच्या खोड्या काढल्या आणि बरंच काही होऊन त्याला बोर्डिंग मधून काढून टाकल्याचं कळालं. पण तरीही त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून मी त्याला इथल्या कॉलेजात ऍडमिशन मिळवून दिली. कठोर मेहेनत आणि करडी शिस्त त्याला पुन्हा रुळावर आणेल याची खात्री होती मला. कारण मी स्वतः तेच करून इथवर आलोय. पण हा कॉलेज मध्ये न जाता भटकत होता. माझ्या व्यायामाच्या शिस्तीला, अभ्यासाला तो त्याच्यावरचा अन्याय समजत होता. त्याला म्हणे लेखक व्हायचे होते. बेशिस्त, व्यायाम न करणारा, रात्री वडिलांचे पैसे चोरून, गाडी चोरून मित्रांबरोबर दारू पिणारा, सिगारेटी फुंकणारा हा तुम्हा प्रेक्षकांनापण अन्यायग्रस्त वाटला हे माझं दुर्दैव.
माझ्या चुका आहेत, मला मान्यही आहेत. दारू ही प्रमुख चूक. नशा जास्त झाला तर माझा कंट्रोल राहत नाही. अर्जुनला त्या दिवशी चुकून मारलं गेलं. मोठी चूक झाली. दुसऱ्या दिवशी बिझनेससाठी दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते. रोहन त्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्यावर सोपवून गेलो. ते जाणे हे जबाबदारीतून पळणे नव्हतेे तर पुढील जबाबदाऱ्या घेण्यासाठी होते. पण रोहनने ही घटना फारच विचित्र पद्धतीने घेतली. मी पुन्हा एकटा पडू लागलो. जिमीला तर माझी शिस्त कधीच आवडली नव्हती. त्याने रोहनला समजावणे तर दूर पण उलट भडकावले. माझे एकटेपण दूर करण्यासाठी मी तिसऱ्या लग्नाचं ठरवलं. या सर्वांचा परिणाम म्हणजे रोहन खूप दूर गेला. त्याने लेखक बनण्यात मला काही अडचण नव्हती. पण शिक्षण पूर्ण करून, स्वतःच्या पायावर आधी उभं राहावं आणि मग काय वाटेल ते करावं एवढंच माझं म्हणणं होतं.
पण कठोर मेहेनत आणि करडी शिस्त म्हणजे वाईट असं मानणाऱ्या या पिढीला हा भैरवसिंग कळाला नाही.
एका गोष्टीचं बरं वाटलं ते म्हणजे माझ्या व्यायामाच्या बळजबरीमुळे रोहन माझ्यापेक्षा वेगात पळू शकला.
पोलिसात तक्रार केल्याने मला अर्जुन पुन्हा मिळू शकला नाही. I hope both are doing good...
मी दुसरीकडे नेहमी म्हणतो, "अक्सर जो दिखता हैं वो होता नही और जो होता है वो दिखता नही"
कधीतरी अर्जुन आणि रोहनला त्यांचा बाप कळेल या अपेक्षेत आणि प्रतीक्षेत
https://g.co/kgs/SSr4Pj
दि. २९ मार्च २०१७
माझ्याकडे वडिलोपार्जित काहीच नव्हते. माझा कारखाना मी सुरू केला. त्यात मेहेनतीने पैसा कमावला. माझा भाऊ, जिमी, त्याला शिकवलं. लग्न झाले. रोहन झाला पण त्याची आई लगेच वारली. काही दिवस रोहनला एकटं सांभाळायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही आणि खरं तर बायकोशिवाय मी राहणं मला अवघड होतं. त्याच्यावर सावत्रआईचा त्रास नको आणि त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून त्याला बोर्डिंगला पाठवलं. त्यानंतर लग्न केलं. दुर्दैवाने अर्जुन 5 वर्षांचा असताना त्याची आईही वारली. माझ्या दोन्ही बायका गेल्या पण माझं कुणी ना सांत्वन केलं ना मदत. बायकोच्या माहेरहून कोणी माझ्यावर कसलेही आरोप केले नाहीत हे माझं नशीबच म्हणावं लागेल.
रोहनला भेटायला मी काही वेळा बोर्डिंगला गेलो होतो. पण त्याला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आणि तोही त्याच्या मित्रांमध्ये खुश दिसला. फुटबॉल छान खेळत होता. चांगलं वाटलं. परत आलो. म्हटलं मुलगा मोठा होतोय, शिकेल आणि आपल्या मेहेनतीवर कमावेल.
पण अचानक त्याने दारू पिऊन धिंगाणा केला, मास्तरांच्या खोड्या काढल्या आणि बरंच काही होऊन त्याला बोर्डिंग मधून काढून टाकल्याचं कळालं. पण तरीही त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून मी त्याला इथल्या कॉलेजात ऍडमिशन मिळवून दिली. कठोर मेहेनत आणि करडी शिस्त त्याला पुन्हा रुळावर आणेल याची खात्री होती मला. कारण मी स्वतः तेच करून इथवर आलोय. पण हा कॉलेज मध्ये न जाता भटकत होता. माझ्या व्यायामाच्या शिस्तीला, अभ्यासाला तो त्याच्यावरचा अन्याय समजत होता. त्याला म्हणे लेखक व्हायचे होते. बेशिस्त, व्यायाम न करणारा, रात्री वडिलांचे पैसे चोरून, गाडी चोरून मित्रांबरोबर दारू पिणारा, सिगारेटी फुंकणारा हा तुम्हा प्रेक्षकांनापण अन्यायग्रस्त वाटला हे माझं दुर्दैव.
माझ्या चुका आहेत, मला मान्यही आहेत. दारू ही प्रमुख चूक. नशा जास्त झाला तर माझा कंट्रोल राहत नाही. अर्जुनला त्या दिवशी चुकून मारलं गेलं. मोठी चूक झाली. दुसऱ्या दिवशी बिझनेससाठी दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते. रोहन त्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्यावर सोपवून गेलो. ते जाणे हे जबाबदारीतून पळणे नव्हतेे तर पुढील जबाबदाऱ्या घेण्यासाठी होते. पण रोहनने ही घटना फारच विचित्र पद्धतीने घेतली. मी पुन्हा एकटा पडू लागलो. जिमीला तर माझी शिस्त कधीच आवडली नव्हती. त्याने रोहनला समजावणे तर दूर पण उलट भडकावले. माझे एकटेपण दूर करण्यासाठी मी तिसऱ्या लग्नाचं ठरवलं. या सर्वांचा परिणाम म्हणजे रोहन खूप दूर गेला. त्याने लेखक बनण्यात मला काही अडचण नव्हती. पण शिक्षण पूर्ण करून, स्वतःच्या पायावर आधी उभं राहावं आणि मग काय वाटेल ते करावं एवढंच माझं म्हणणं होतं.
पण कठोर मेहेनत आणि करडी शिस्त म्हणजे वाईट असं मानणाऱ्या या पिढीला हा भैरवसिंग कळाला नाही.
एका गोष्टीचं बरं वाटलं ते म्हणजे माझ्या व्यायामाच्या बळजबरीमुळे रोहन माझ्यापेक्षा वेगात पळू शकला.
पोलिसात तक्रार केल्याने मला अर्जुन पुन्हा मिळू शकला नाही. I hope both are doing good...
मी दुसरीकडे नेहमी म्हणतो, "अक्सर जो दिखता हैं वो होता नही और जो होता है वो दिखता नही"
कधीतरी अर्जुन आणि रोहनला त्यांचा बाप कळेल या अपेक्षेत आणि प्रतीक्षेत
https://g.co/kgs/SSr4Pj
दि. २९ मार्च २०१७
No comments:
Post a Comment