दोन दिवसांपूर्वी लिहिताना सहजच दोन शब्द लिहिले गेले. एक नेहरूंच्या परराष्ट्रनीतीसाठी होता - अलिप्ततावादी आणि दुसरा मोदींच्या परराष्ट्रनीतीसाठी होता निर्लिप्ततावादी. गेले दोन दिवस डोक्यात एक धागा या दोन शब्दांभोवती फिरतोय. त्यात जो काही विचार मनात आला तो शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय.
आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की नेहरूंनी त्यांच्या परराष्ट्रनीतीबद्दल शद्ब इंग्रजी वापरला होता - non aligned. त्याचं भाषांतर करताना कदाचित वेगळा शब्द योजता आला असता.
अलिप्तता/निर्लिप्तता यावर पुन्हा परत येतोय. यासाठी सर्वात आधी एक उदाहरण देतो. अर्थात महाभारतातील. बलरामाला युद्ध व्हावे असं वाटत नव्हतं. केवळ राज्यासाठी होणारं प्रचंड मोठं युद्ध त्याला नकोसं वाटत होतं. त्यामुळे बलराम युद्धाआधी वनवासात गेला आणि युद्धाच्या शेवटच्या दिवशी परतला. कृष्णालाही युद्ध व्हावं असं वाटत नव्हतं. पण त्याने शिष्टाई केली. जेव्हा युद्ध थांबवण्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडणार याची खात्री झाली तेव्हा जो पक्ष खरा वाटला, त्याच्या बाजूने युद्धात नि:शस्त्र गेला. पांडवांना नैतिक मदत आणि मार्गदर्शन दिले.
माझ्या मते या उदाहरणात बलराम अलिप्त राहिला तर कृष्ण निर्लिप्त!
माझ्या मते या उदाहरणात बलराम अलिप्त राहिला तर कृष्ण निर्लिप्त!
तुकारामांच्या एका अभंगात ते म्हणतात,
अणूरेणूया थोडका। तुका आकाशाएवढा।
गिळुनि सांडिले कळीवर। भवभ्रमाचा आकार।।
सांडिली त्रिपुटी। दीप उजळला घटी।
तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता।।
यात तुकाराम ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास सांगत नाहीत, तर कोणत्याही अपेक्षेशिवाय उपकार करायचे सांगतात. म्हणजेच निर्लिप्तपणे काम करायचे सांगतात. अलिप्तपणे कर्मसंन्यास घेण्याचे सांगत नाहीत. भगवद्गीतेची हीच शिकवण लोकमान्यांनी गीतारहस्यात सांगितली आहे.
अणूरेणूया थोडका। तुका आकाशाएवढा।
गिळुनि सांडिले कळीवर। भवभ्रमाचा आकार।।
सांडिली त्रिपुटी। दीप उजळला घटी।
तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता।।
यात तुकाराम ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास सांगत नाहीत, तर कोणत्याही अपेक्षेशिवाय उपकार करायचे सांगतात. म्हणजेच निर्लिप्तपणे काम करायचे सांगतात. अलिप्तपणे कर्मसंन्यास घेण्याचे सांगत नाहीत. भगवद्गीतेची हीच शिकवण लोकमान्यांनी गीतारहस्यात सांगितली आहे.
कदाचित अलिप्त व निर्लिप्त या शब्दांच्या अर्थामध्ये कुणाला फरक आहे असे वाटणार नाही. पण मला जो वाटला तो मी सांगितला.
निर्लिप्तता काय असते हे सांगणारी सुरेश भटांची कविता देऊन थांबतो.
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
सांगती ’तातपर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !"
"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !"
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
दि. १३ फेब्रुवारी २०१८
No comments:
Post a Comment