लोकसत्तामध्ये एक पुस्तक (व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो) परिचय वाचला. त्यावरील माझे मत.
राष्ट्रवादाची मांडणी काय आहे, कशी असावी हे मुद्दे चर्चेचे असू शकतात पण राष्ट्रवादच नाकारणे के चुकीचे आहे. राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी काही प्रतीके लागतात आणि तेव्हाच देश एकत्र राहू शकतो. ही प्रतीके राष्ट्रगीत, ध्वज, महापुरुष अशी असतात, आणखीही असू शकतात.
भारत माता की जय अशा घोषणा देणाऱ्यांना नेहरूंनी विचारलं होतं की भारत माता म्हणजे काय, कोण? त्याचं उत्तर त्यांनीच दिलं की, भारत माता म्हणजे ही जमीन, झाडं, नद्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व भारतात राहणारे. हे सगळं मिळून भारत माता होते. म्हणजे नेहरूंनासुद्धा भारत एक देश ही संकल्पना मान्य होती. इथे सांगण्याचं कारण म्हणजे चौधरींना नेहरू आवडतात.
जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.
ब्रिटिशांपूर्वी जर भारत एक नव्हता तर पानिपतावर लाखो मराठ्यांनी आत्मबालिदान का केलं? महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला अब्दालीला कित्येक वर्षे लागली असती किंवा तो आलाही नसता. मग तरुण भावी पेशवा आणि पेशव्यांचा भाऊ तिथे जाऊन का लढले? कारण अब्दाली परकीय होता. दिल्लीचे तख्त जरी मुस्लिम असले तरी ते भारतीय होते. आणि ते वाचवणे मराठ्यांना कर्तव्य वाटले.
त्याआधी अकबराला संपूर्ण भारतावर एकछत्री अमल असावा असं का वाटलं? संपूर्ण भारत म्हणजे काय? तेव्हा तर ब्रिटिश कुठेच नव्हते. मग त्याला केवळ भूभाग त्याला ताब्यात घ्यायचा होते का? नाही, अकबराला संपूर्ण भारत जी आधीपासूनची संकल्पना होती ती एका अमलाखाली आणायची होती.
त्याही आधी चाणक्याने अलेक्झांडरला पराभूत करण्यासाठी सीमेवरील राज्यांची मोट बांधली आणि चाणक्य त्यात यशस्वी झाले. ही मोट का बांधली गेली? आणि सीमेवरील म्हणजे काय? तर भारतीय सीमेवरील. पण इंग्रजांच्या आधी तर भारत नव्हता ना... मग हे कसे झाले. चाणक्याने नंतर मगध हस्तगत करून चंद्रगुप्ताला राजा बनवले आणि अधिक समर्थ साम्राज्य निर्माण केले.
त्याही आधी, वेदात
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
भारत एक राष्ट्र आहे याचा उच्चार आहे.
अर्थात हे कितीही तर्कशुद्ध पटवण्याचा प्रयत्न केला तरीही विचारवंत केवळ आणि केवळ डावे असतात असं समाजणार्यांना ते कळणार नाही. पण ज्यांना कळेल त्यांनी ते समजून घ्यावं म्हणून हे लेखन.
दि. ४ मार्च २०१७
राष्ट्रवादाची मांडणी काय आहे, कशी असावी हे मुद्दे चर्चेचे असू शकतात पण राष्ट्रवादच नाकारणे के चुकीचे आहे. राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी काही प्रतीके लागतात आणि तेव्हाच देश एकत्र राहू शकतो. ही प्रतीके राष्ट्रगीत, ध्वज, महापुरुष अशी असतात, आणखीही असू शकतात.
भारत माता की जय अशा घोषणा देणाऱ्यांना नेहरूंनी विचारलं होतं की भारत माता म्हणजे काय, कोण? त्याचं उत्तर त्यांनीच दिलं की, भारत माता म्हणजे ही जमीन, झाडं, नद्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व भारतात राहणारे. हे सगळं मिळून भारत माता होते. म्हणजे नेहरूंनासुद्धा भारत एक देश ही संकल्पना मान्य होती. इथे सांगण्याचं कारण म्हणजे चौधरींना नेहरू आवडतात.
जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.
ब्रिटिशांपूर्वी जर भारत एक नव्हता तर पानिपतावर लाखो मराठ्यांनी आत्मबालिदान का केलं? महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला अब्दालीला कित्येक वर्षे लागली असती किंवा तो आलाही नसता. मग तरुण भावी पेशवा आणि पेशव्यांचा भाऊ तिथे जाऊन का लढले? कारण अब्दाली परकीय होता. दिल्लीचे तख्त जरी मुस्लिम असले तरी ते भारतीय होते. आणि ते वाचवणे मराठ्यांना कर्तव्य वाटले.
त्याआधी अकबराला संपूर्ण भारतावर एकछत्री अमल असावा असं का वाटलं? संपूर्ण भारत म्हणजे काय? तेव्हा तर ब्रिटिश कुठेच नव्हते. मग त्याला केवळ भूभाग त्याला ताब्यात घ्यायचा होते का? नाही, अकबराला संपूर्ण भारत जी आधीपासूनची संकल्पना होती ती एका अमलाखाली आणायची होती.
त्याही आधी चाणक्याने अलेक्झांडरला पराभूत करण्यासाठी सीमेवरील राज्यांची मोट बांधली आणि चाणक्य त्यात यशस्वी झाले. ही मोट का बांधली गेली? आणि सीमेवरील म्हणजे काय? तर भारतीय सीमेवरील. पण इंग्रजांच्या आधी तर भारत नव्हता ना... मग हे कसे झाले. चाणक्याने नंतर मगध हस्तगत करून चंद्रगुप्ताला राजा बनवले आणि अधिक समर्थ साम्राज्य निर्माण केले.
त्याही आधी, वेदात
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
भारत एक राष्ट्र आहे याचा उच्चार आहे.
अर्थात हे कितीही तर्कशुद्ध पटवण्याचा प्रयत्न केला तरीही विचारवंत केवळ आणि केवळ डावे असतात असं समाजणार्यांना ते कळणार नाही. पण ज्यांना कळेल त्यांनी ते समजून घ्यावं म्हणून हे लेखन.
दि. ४ मार्च २०१७
No comments:
Post a Comment