१. महिन्यांची नावे - आपल्या महिन्यांची नावे नक्षत्रांवरून दिलेली आहेत. जेव्हा चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात (किंवा जवळ) असतो त्या नक्षत्राच्या नावावरून महिन्याचे नाव असते.
उदा: चित्रा - चैत्र, विशाखा - वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ, मृग - मार्गशीर्ष
२. अधिक मास - आपले महिने हे चंद्रकलेवर अवलंबून असतात. सौर आणि चांद्र मासात साधारण ०.९ दिवसाचे अंतर एका महिन्यात पडते. त्यामुळे दर ३ वर्षांनी हे अंतर match करण्यासाठी अधिक मास असतो. अधिक मास केवळ पहिल्या सात महिन्यातच असतो, म्हणजे चैत्र ते अश्विन हे महिने अधिक मास म्हणून येतात त्यापुढील नाही.
हिजरी कालगणना (मो. पैगंबरांनी जेव्हा मक्केतून मदिनेत पलायन - हिजरात केलं त्या दिवसापासूनची कालगणना) ही सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. पण त्यात अधिक मास नसतो. म्हणून दर ३ वर्षांनी एकत्र येणारे हिंदू व मुस्लिम सण बदलतात. मात्र चिनी कालगणना चांद्र असूनही त्यात अधिक मासासारखी व्यवस्था असल्याने ग्रेगोरियन कालगणनेनुसार ते पुन्हा जुळते.
हिजरी कालगणना (मो. पैगंबरांनी जेव्हा मक्केतून मदिनेत पलायन - हिजरात केलं त्या दिवसापासूनची कालगणना) ही सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. पण त्यात अधिक मास नसतो. म्हणून दर ३ वर्षांनी एकत्र येणारे हिंदू व मुस्लिम सण बदलतात. मात्र चिनी कालगणना चांद्र असूनही त्यात अधिक मासासारखी व्यवस्था असल्याने ग्रेगोरियन कालगणनेनुसार ते पुन्हा जुळते.
३. तिथी निश्चिती - आपले काही सण हे चंद्र उगवताना त्याची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात तर काही सूर्य उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात. जसे संकष्टी चतुर्थी ही चंद्र उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे सकाळी तृतीया आणि त्याच दिवशी संकष्टी असं बऱ्याचदा होतं. कोजागिरी पौर्णिमा ही रात्री चंद्राची कला कोणती आहे यावर अवलंबून असते तर ज्येष्ठ पुत्र/पुत्रीला ओवळण्याची अश्विन पौर्णिमा ही सकाळी कोणती चंद्रकला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे आपण दूध एका रात्री पितो तर ओवाळण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होतो.
४. तिथी क्षय - काही वेळा एका तिथी नंतर एक skip करून त्या पुढची तिथी येते. त्याला तिथी क्षय म्हणतात. सूर्य उगवताना चंद्राची कला जी असेल ती त्या दिवशीची तिथी असते. पृथ्वीची परिवलन गती आणि चंद्राची परिभ्रमण गती वेगवेगळी असल्याने हे होते.
उदा: द्वितीयेनंतर चतुर्थी आली. या वेळी द्वितीया ही अगदीच सूर्य उगवण्याच्या नंतर संपली, तृतीया सुरू होऊन ती दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याआधी संपली आणि सूर्योदयाला चतुर्थी लागलेली होती. या उदाहरणात तृतीयेचा क्षय झाला.
उदा: द्वितीयेनंतर चतुर्थी आली. या वेळी द्वितीया ही अगदीच सूर्य उगवण्याच्या नंतर संपली, तृतीया सुरू होऊन ती दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याआधी संपली आणि सूर्योदयाला चतुर्थी लागलेली होती. या उदाहरणात तृतीयेचा क्षय झाला.
५. सौर सण - भारतीय सणांमध्ये एकमेव संक्रांत हा सण आहे जो सौर स्थितीवर अवलंबून असतो. संक्रांत ही १४ जानेवारीला येत नाही तर ती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा येते. शिवकाळात संक्रांत १२ जानेवारीला यायची. आता १४ किंवा १५ जानेवारीला येते. याचे कारण गेल्या ३०० वर्षात पृथ्वीच्या गतीत झालेला बदल हे आहे. लोकमान्यांच्या अभ्यासानुसार मकर संक्रांत महाभारत काळात नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये येत असे.
दैनंदिन व्यावहारिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
दि. १ जानेवारी २०१८
No comments:
Post a Comment