Tuesday, March 20, 2018

गंगाजमनी तहजीब

एक फुर्रोगामी मेसेज फिरतोय... त्याचे उत्तर
ताजमहाल कि तेजोमहाल हे माहित नसलेल्या लोकांसाठी ,
== ताज महाल की तेजोमहालय हे स्कॅनिंग आणि सगळे ताज मध्ये असलेले दरवाजे उघडून स्पष्ट होईल. ते काम संशोधकांचे आहे. मी त्यात पडणार नाही. आणि योगी आदित्यनाथ यांनी एक मुद्दा स्पष्ट केलाय तो म्हणजे ताज भारतीयांनी बांधला आहे. भारतीय वास्तुकलेचा (मुस्लिम प्रभाव असलेला) तो एक उत्तम नमुना आहे. एवढं कारण ताज ला आपलं मानण्यासाठी more than sufficient आहे.
पण त्याखाली शहाजहानच्या प्रेमाचे गोडवे गायले जातात ते चुकीचे आहे. एका बाईच्या नवऱ्याला मारून तिच्याशी निकाह करायचा, तिला १७ वर्षांत १४ वेळा प्रसूती सहन करायला लावायची, त्यात १४व्या वेळी ती मरते, नंतर तिच्या बहिणीशी निकाह करायचा... यात मुमताज वर असलेलं प्रेम कुठे आहे? पण हे विचारणं इतिहास असला तरी सोयीचं नाही.
---
तक्रार , फिर्याद ,गुन्हा शब्द माहितेय का ? ह्या शब्दांचा वापर मराठीत सरकारी भाषेत सहजपणे केला जातो त्याच मूळ माहितेय का ? किंवा त्याचा मराठी प्रतिशब्द माहितेय का ?
== नाही माहीत. भाषा ही अन्य भाषांमधून नवे शब्द घेऊन समृद्ध होत असते. जी भाषा हे नाकारते ती मृत होते.
---
आंब्याच मूळ माहितेय का ?
गुलाबाच मूळ माहितेय का ?
== आंबा पूर्व भारत आणि म्यानमार
== गुलाब मेक्सिको आणि उत्तर आफ्रिका
याचा ताजशी काय संबंध आहे ते माहीत नाही. उगा प्रश्न अनुत्तरित राहू नये म्हणून सांगितले
---
ज्या मुघल खानदानीच्या नावाने कडाकडा बोट मोडली जातात त्या अकबराच्या सेनापतीच नाव राजा मानसिंग होत हे माहितेय का ?
== माहितीये ना. म्हणून मानसिंगला आम्ही महाराणा म्हणत नाही तर केवळ प्रतापांना महाराणा म्हणतो. जे परकीय अकबराच्या विरोधात लढले होते.
---
अकबराच्या दरबारातली नवरत्न माहितेय का ? तानसेन माहितेय का ?
लहानपणी ज्याच्या गोष्टी वाचून मोठे झालोय तो बिरबल कुणाच्या पदरी काम करायचा माहितेय का ?
== अकबराच्या दरबारात होते. जेव्हा अकबराला लक्षात आले की आपण केवळ मुस्लिम म्हणून भारतात राज्य करू शकत नाही तेव्हा दीने इलाही ची सुरुवात त्याने केली. पहिल्या ६० वर्षातला अकबर आणि नंतरचा अकबर यात खूप अंतर आहे. पाहिले ६० वर्ष दडवून ठेवले जातात करण ते पुरोगाम्यांना सोयीचे नाहीत.
---
हळदीघाटी च्या लढाईत जेव्हा मानसिंग अकबराचा सेनापती होता तेव्हा राणा प्रतापाचा सेनापती कोण होता ?
हाकिम खान सुरी हा पश्तून लढवय्या राणा प्रतापाचा सेनापती होता हे माहितेय का ?
== So what?
---
हिंदू व्यापारी सुरक्षितपणे व्यापार करावेत आणि प्रवास करावेत म्हणून त्यांना संरक्षण देणारा आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावून, पाण्याची व्यवस्था करून सराया बांधणारा शेरशहा सुरी माहितेय का ?
== Good. पण हे केवळ हिंदू व्यापाऱ्यांसाठी नव्हतं तर सगळ्याच व्यापाऱ्यांसाठी होतं. आणि त्याच बरोबर केवळ हिंदूंवर औरंगजेबाने लावलेले जिझिया सारखे कर सुद्धा माहीत आहेत.
---
मुघलांच्या कबिल्यात सगळ्यात जास्त विवाहसंबंध करणाऱ्या राजपुतांचा इतिहास माहितेय का ?
== राजपुतांनी महाराणा प्रतापांनंतर मुघलांना विरोध केलाच नाही. त्यांनी मुघली पद्धत आत्मसात केली आणि विवाहसंबंध वाढवले. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठलाही आदर बाळगण्याची गरज वाटत नाही.
---
खापरी नळाने खडकी गावाला आणि अहमदनगर शहराला पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करणारा हबशी मलिक अंबर माहितेय का ?
शेतसारा , जमीन मोजणी ह्या प्रशासकीय कामात सुसूत्रता आणून राज्यकारभार करणारा मलिक अंबर माहितेय का ?
== मलिक अंबर चांगला होता. त्याने शहाजी राजांना बरीच मदत केली होती. त्याचे अनुकरण नानासाहेब पेशव्यांनी करून कात्रज तलावातून पुण्यात पाणी व्यवस्था केली.
---
शिवाजी महाराजांना पराभूत करून तह करून आग्र्याला यायला लावणारा मिर्झा राजे जयसिंग माहितेय का ?
== माहीत आहे. पण मग शिवाजी महाराजांनी गंगा जमनी तहेजीब म्हणून औरंगजेबापुढे मान नाही झुकवली. परत येऊन २३ किल्ले परत घेतले आणि त्यापुढे पहिल्या बाजीरावाने दिल्लीला धडक दिली.
---
दिल्लीच्या बादशहाच्या बरोबर केलेल्या कराराच पालन करायला पानिपतावर प्राण देणारे सव्वा लाख मराठे माहितेय का ?
पानिपतावर खंडण्या भरून मराठा सरदारांची प्रेत ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारा सुजा माहितेय का ?
== याच सुजाला सदाशिवराव भाऊंनी अब्दाली बाहेरचा आहे आणि तू भारतीय आहे. त्यामुळे अब्दालीला मदत न करता तू आम्हला मदत अशी विनंती केली. पण नजीब खानाच्या नादी लागून सुजाने अब्दालीला केवळ मुस्लिम आहे म्हणून मदत केली आणि त्याचे सैन्य मराठ्यांच्या विरोधात लढलं, मराठ्यांना मारलं आणि मग अंत्यसंस्कार केले. आम्हाला हे सुद्धा माहीत आहे.
---
१८५७ ला इंग्रजांच्या विरोधात लढलेली लढाई ज्याच्या नेतृत्वाखाली लढली तो बहादूरशहा माहितेय का ?
== कारण दिल्ली दरबाराशी झालेले करार मराठे १८५७ मध्ये पण पाळत होते. म्हणून दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांनी बहादूरशहाचे नेतृत्व पुढे ठेऊन सगळी तयारी केली.
---
आजही ग्रामीण महाराष्ट्रात गावच्या पिराला पहिली चादर आणि शेरणीचा मान हिंदू कुटुंबाला असतोय हे माहितेय का ?
== मुळात पीर ही संकल्पना मुस्लिम विरोधी आहे कारण ते प्रतीक पूजन आहे. पण काही सुफी संत आणि हिंदू संत यांनी तो केलेला एक ऐक्याचा प्रयत्न आहे. म्हणून कट्टर सुन्नी कधीही पिराला जात नाही. मुहर्रम मध्ये ताबूत नाचवत नाही. त्यामुळे प्रतीक पूजेला हिंदू असणं हे सामान्य आणि सहजमान्य आहे.
---
हि यादी लांबवत नेली तर पाच पन्नास नाही तर शेकडो पान कमी पडतील.
इतिहास कधीही सोयीचा नसतोय. इतिहासाची थडगी उकरायला गेल कि आपल्याला सोयीचे असणारे सांगाडे जसे सापडतात तसेच गैरसोयीचे सांगाडे हातात हात घालून उकरून वर येतात.
== Exactly. म्हणूनच
१. शिवाजी महाराजांनी मंदिर पाडून उभी केलेली मशीद जमीनदोस्त केली व पुन्हा मंदिर उभारले हे सांगितले जात नाही
२. हैदर अलीला नानासाहेब, माधवराव पेशव्यांनी किती वेळा हरवले हे सांगितले जात नाही
३. टिपू सुलतान किती क्रूर होता आणि त्याने हिंदूंना संपवण्याचे काय प्रयत्न केले हे समोर येत नाही. समोर येते ते त्याने आपले राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांना विरोध केला ते, आणि त्यालाच भारतमातेसाठीचे स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जाते.
४. पण टिपूच्या न्यायाने दुसऱ्या बाजीरावाने त्र्यंबक डेंगळे यांच्यासोबत इंग्रजांना दिलेली लढत दाखवली जात नाही. इथे इंग्रजी सैन्याच्या महार रेजिमेंटचा पेशव्यांवरील विजय आजही साजरा होतो.
५. औरंगजेबाने काशीचे मंदिर पाडले आणि तिथे ज्ञानवापी मशीद बांधली ये ऐतिहासिक सत्य बोलायचेही नसते
६. संभाजी महाराज आणि त्यांचा मित्र कवी कलश यांना हाल हाल करून मारले हे कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात नसतं. आपल्याकडील काही मुस्लिम अजूनही औरंगजेबाला सुफी संत म्हणतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही.
हे आणि असे अनेक सांगाडे गंगा जमनी तेहजीब म्हणून गाडलेले आहेत आणि ते खरे इतिहास जाणणारे, संघ आणि हिंदुत्ववादी लोक उकरून काढत आहेत. यात सोयीचे सांगाडे असावेत म्हणून हा उद्योग सुरू नाहीये तर खरा इतिहास लोकांना माहीत असावा म्हणून सुरू आहे.
------
हि गंगा जमनी तेहजीब भारताची खरी संस्कृती आहे.
हे धागे एवढे घट्ट विणलेले आहेत कि जे उसवायला गेलात तर तुमची बोटच काय तुम्हीही उखडून पडाल.
== वर दिल्याप्रमाणे खरा इतिहास जेव्हा जनतेसमोर येईल तेव्हा जनताच खोटा इतिहास पसरवणाऱ्यांची बोटं उखडायची की त्यांना आख्खं उखडायचं ते ठरवेल. एखाद्या गोष्टीची शांतपणे वाट पाहणे यात संघवाल्यांपेक्षा अजून केवळ शास्त्रज्ञच पुढे आहेत. त्यामुळे वाट बघू.

दि. ३१ ऑक्टोबर २०१७

No comments:

Post a Comment